Home स्मार्ट बुलढाणा धाडनगरीतील वाढती रहदारी ठरतेय डोकेदुखी! 
स्मार्ट बुलढाणा

धाडनगरीतील वाढती रहदारी ठरतेय डोकेदुखी! 

अभिनय बोर्डे
धाड (प्रतिनिधी):
बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या धाडनगरीत वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. बुलढाणा ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौलाना आझाद चौकात वाहनांच्या प्रचंड वेगामुळे अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरून आहे.
धाडनगरीतील मौलाना आझाद चौक हा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, विठ्ठलवाडी, पुणे आणि मुंबईकडे दिवसाकाठी हजारावर वाहने ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने रस्ता ओलांडताना पादचारी, शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. विशेष म्हणजे हा चौक बाजारपेठ, रिक्षा थांबा आणि निवासी वस्तीच्या जवळ असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने शास्त्रोक्त गतिरोधक बसवावेत. वाहनधारकांसाठी सूचना फलक व वेगमर्यादेचे फलक लावावेत, आणि वर्दळीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.
संबंधित विभागाकडून उडवाउडवीचे उत्तर
या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावून गतिरोधक टाकावे, अशी मागणी सबंधित विभागाकडे नागरिकांनी अनेकदा केली. मात्र, “हा राष्ट्रीय महामार्ग आहे” असे तांत्रिक कारण पुढे करून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकून टाकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे “एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता धाडकर विचारत आहेत.
दुचाकीधारकांनाही शिस्तीची गरज
या चौकात असलेल्या हॉटेल आणि व्यावसायिकांनी दुकाने आधीच रस्त्यापर्यंत आलेली आहेत. त्यातच भर म्हणून या हॉटेल्स आणि प्रतिष्ठानमध्ये येणारे ग्राहक दुकानासमोर आपली वाहने उभी करतात. त्यामुळे अर्धा रस्ता वाहनांच्या पार्किंगमध्ये व्यापला जातो. परिणामी रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना पुरेशी जागा मिळत नाही. अशावेळी वाहनाचा धक्का लागून वादविवाद होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांना मज्जाव करणे देखील,तितकेच गरजेचे आहे, हे विशेष!

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...